Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



इथ बदललंय काय?

लेखनप्रकार: 
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

१९७२ ते २०१३ इथ बदललंय काय/
तवा बी पाण्याचा प्रश्न व्हता नि आज बी हाय .
दरवरीस सरकारची नवी योजना
पर शेतक-यापर्यंत कधीच पोचंना ...
मत मागताना पुढारी म्हणत्यात
तुमीच आमच बाप आन माय
पन गरजला जवल कोण न्हाय
विहिरी पडल्यात सुक्या त्यात पाण्याचा थेंब न्हाय
एक हंडा पाण्यासाठी दुस-या गावी जाते माय
पाय दुखत्यात म्हणून कुरकुर करते ताय
माणसाचं सोडलं तर
पाण्यावाचून चवताळते ती माझ्या गोठ्यातली बैल आन गाय
पक्ष्याचं तरी कोण ऐकल जिथं माणसांसाठी सोय न्हाय
झाडांच मोहोर गेल सुकून...
फळ तर सोडाच यंदा फुल पण गेले करपून
उम्बईतयेतो घरोघरीच पूर
म्हणत्यात मोजातो आम्ही पैस भरपूर
आमच गाव म्हणजे शेतीवाडी अन पैश्यांपासून खूप दूर
आमच गाव म्हणजे शेतीवाडी अन पैश्यांपासून खूप दूर
वर्षाच्या सुरवातीलाच पाणीपाणी करतुय पर कुणालाच यत न्हाय कीव
वाटतंय वैशाख येई पर्यंत कितीतरी बोलक्या अन मुक्या प्राण्यांच जातील जीव
पाणी आता फक्त आमच्या डोळ्यात उरलय..
बोलता बोलता उरलेल एक थेंब पण गालावर घसरलय
१९७२ ते २०१३ इथ काय बदललंय?

--
Kavigore

Share

प्रतिक्रिया