Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



rameshwar

rameshwar's picture
Email subscriptions: 
Email
Wall Post
rameshwar updates its status
September 23, 2018 at 03:34pm
शेतकऱ्यांच्या चळवळी आज प्रत्येक गल्लीबोळामध्ये उभ्या राहत आहेत ह्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना स्थापन करण्यामागे कारण काय तर याचे कारण महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध हिंदुस्थान भरामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा त्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या समस्या वरती उपाय सुचवणारा एकही विचारवंत भारतात आजघडीला नाही. ही आजची परिस्थिती. 1980 साली शरद जोशींनी शेतकरी संघटना स्थापन केली त्यावेळी अशा वेगवेगळ्या शेतकरी संघटना गल्लीबोळामध्ये उभ्या राहत नव्हत्या कारण शरद जोशी होते शरद जोशी हे प्रत्यक्ष शेती करून शेतीचा अभ्यास केला शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला त्यांनी हात घातला शेतक-यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती म्हणून केवळ फक्त शरद जोशी या एका व्यक्तीभोवती संपूर्ण भारतातील शेतकरी गोळा झाले. आज हे होताना दिसत नाही. शरद जोशी गेल्यानंतर दुसरा वैचारिक मांडणी करणारा नेता आपल्या समोर नाही हे एकमेव कारण नवनवीन संघटना स्थापन होण्यामध्ये आहे. शरद जोशी यांच्या शेतकरी प्रश्नाच्या आकलनात त्यांनी स्विझर्लंड मध्ये नोकरीच्या निमित्ताने तिथल्या समाजजीवनाच्या घेतलेल्या अनुभवासह महत्त्वाचे स्थान आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर भारतामध्ये शेतकर्‍यांची संघटना झाली ही फक्त शरद जोशी यांच्यामुळे आपण ज्योतिबा पासून ते आजपर्यंत जर का बदलत्या परिस्थितीचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे आकलन हे व्यापक झाले ते केवळ शरद जोशी यांच्या मुळे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर त्याचे परिणाम प्राप्त झाले. जातीव्यवस्था आणि ग्रामव्यवस्था यांना ओलांडून शरद जोशी शेतीच्या व्यापक अर्थव्यवस्थेची सांगड घालून इच्छित होते ऐंशीच्या दशकामध्ये शेतकरी चळवळ ही खूप प्रभावशाली होती पण शेतकरी चळवळीत फूट पाडण्याचे काम आजवर प्रत्येक राजकीय पक्षाने केलेले आहे शेतकरी चळवळ आणि इतर राजकीय पक्ष तसा जवळचा संबंध कधीही नव्हता तरी या चळवळीत फूट पाडण्यात प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजवर कारणीभूत ठरलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आजवरचा इतिहास हे सांगतो केवळ एका राजकीय पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. चळवळीचे नेतृत्वाला लागलेली राजकीय हव्यासही यानिमित्ताने समोर येत आहे चळवळीच्या नेतृत्वाला राजकीय खुर्चीचे डोळे लागल्यावर दुसरे काय होणार चळवळीचा हर्ष उदाहरणार्थ राजू शेट्टी सदाभाऊ खोत शंकर धोंडगे अनिल गोटे लक्ष्मण वडले अशी कित्येक नाव घेता येतील की ज्यांना राजकीय खुर्चीचा हव्यासापोटी ते बाहेर गेले ऐंशीच्या दशकामध्ये शेतकरी चळवळ उभारणे ही काही सोपे काम नव्हते दिवंगत शरद जोशी यांनी सारे आयुष्य या चळवळीसाठी व्यतीत केले संघटना त्या काळामध्ये राज्य वरच नव्हे तर देशभर वेगवेगळ्या सभा घेतल्या श्री जोशी यांना खूप पायपीट करावी लागली. शरद जोशी शेतकरी संघटना हा जागतिक कौतुकाचा विषय ठरला करण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या युनोसारख्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातला एक अधिकारी मोठ्या पदावरती काम करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा सांधा बदलून या परत देशात परत येतो शेतकऱ्यांचे संघटन बांधतो बघता बघता मोठी लढाई उभी करतो हे सगळे त्याकाळी अविश्वासनीय वाटत होते, शेतकरी संघटना हा शरद जोशी यांचा श्वास होता युनो मध्येमोठ्या पगारावर काम करत असताना ती नोकरी सोडल्यानंतर त्यांनी स्वतःला आमूलाग्र बदल करून घेतले आणि शेतकरी जीवनाची ते एवढे एकरूप झाले की तिथपर्यंत शेतीची प्रत्यक्ष संबंध नसलेला हा माणूस शेतकऱ्याला आपल्या नांगरा एवढा जवळचा वाटू लागला शेतकऱ्यांच्या कष्टाचे अर्थशास्त्रीय शरद जोशी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला भाव ठरवताना जोशी यांनी मांडलेल्या कष्टाच्या अर्थशास्त्राची सुद्धा दखल घ्यावी लागली हेच त्यांचे सर्वात मोठा यश आहे. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचा व्यक्तिगत जीवनासाठी कधीही वापर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच शरद जोशी यांनी जिवंत असताना संपूर्ण ताकीदीचा वापर केला नाही. स्वतःसाठी संघटन त्यांनी काही मिळवले किंवा संघटनेचा नावावर काही केलं असा एकही प्रकार कधी घडला नाही शेतकऱ्या बद्दलचे त्यांचे महत्त्व हे मनापासूनचे होते दिखाव्यासाठी ते पुढारी नव्हते आणि दिखाव्यासाठी ते कधीही प्रचारक नव्हते पत्रकार जवळ करून त्यांच्या संघटनेची माहिती अधिकाधिक कशी प्रसिद्ध करता येईल याचा त्यांनी विचार केला नाही. आणि संघटनेच्या विरुद्ध कोण आहे त्याचाही भाऊ कधी त्यांनी केला नाही आपले काम प्रभावीपणे करीत राहणे हीच भूमिका त्यांनी सातत्याने बजावली आज ना उद्या आपण जगाचा निरोप घेणार हे जाणवल्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय विचारपूर्वक आपले स्वतःचे मृत्युपत्र तयार केलेले एक संस्कार मानला जातो त्यामुळे या जगाचा निरोप घेताना सिकंदर रिकाम्या हाताने जावे लागले. भारतामध्ये शेतीची समस्या सर्वप्रथम शरद जोशी यांनी देशाच्या विषयपत्रिकेवर ती आणली शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढती महागाई शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाला पोसताना आलेली हतबलता यामुळे महाराष्ट्रासह देशात गेली पंचवीस-तीस वर्षे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतरही केंद्र सरकारला जाग आलेली नव्हती कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या समस्या केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या वेशीला टांगली गेली. भारताची बदनामी झाली भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच असल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली तोट्यातील शेती परवडेना झाली निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या बहुतांश शेती व्यवसायाला अवकळा आली जोशी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून वाजवी भाव मिळावा यासाठी उग्र प्रकारचे आंदोलने केली लाखो शेतकऱ्यांनी आपल्या मूलभूत हक्कासाठी तुरुंगवास सोसला शेकडो शेतकऱ्यांचे पोलिसांच्या गोळीबारात बळी गेले अन्नदाता शेतकरी कंगाल झाला भिकेला लागला तरीही केंद्र आणि राज्य सरकारने त्यांची आर्थिक समस्या काही सोडली नाही. परिणामी वर्षभर शेतात राबून भर मेहनत करूनही त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढत गेला सहकारी शेती संस्था बँका खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. आपल्या घरादारावर आणि प्राणापेक्षा प्रिय असलेल्या शेतीच्या तुकड्यावर जप्ती येणार आपली अब्रू जाणार या भीतीने शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केल्यावरही मूळ समस्यांची सोडवणूक अद्यापही झालेली नाही आणि शरद जोशी यांना हे सरकारची मदत नको फक्त शेतकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करावे ही मूलभूत त्यांची मागणी होती त्यातही शेतकऱ्यांच्या मदत निधीतही घोटाळे झाले कापसाला वाजवी भाव मिळाला नाही अद्यापही भात गहू ज्वारी कडधान्ये उसाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितापेक्षा दलाल मध्यस्थ आणि बड्या व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण होते. काही बाजार समित्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव मुद्दामहुन पाडून लुट केली जाते. व्यापाऱ्यांनी सरकारच्या लोकांच्या हातून अत्यंत पद्धतशीरपणे शेतकऱ्यांची कोंडी करायची संधी सोडली नाही. बाजार समितीत जास्त प्रमाणात फळे भाजीपाल्याची आवक जास्त झाल्यास व्यापारी एकजूट करून भाव पाडतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राष्ट्रीय कलंक असला तरीही केंद्र आणि राज्य सरकारांना आपण शेतकऱ्यांची मुले आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या मंत्र्यांनाही त्याची शरम वाटत नाही सरकारच्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कमी झाल्याचा सरकारचा दावा वास्तव वादी नाही देशात तसेच तर महाराष्ट्रात दर महिन्याला ६०/७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये तीन ते चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते आत्महत्याची ही संख्या याचा अर्थ महाराष्ट्रात दर वर्षाला देशाच्या तुलनेत सर्वात जास्त आत्महत्या होतात आत्महत्या होण्यामागचे कारण खाजगी सावकारापासून घेतलेली कर्ज ते फेडु शकत नसल्यामुळे समाजात बदनामी होते सावकार जमिनी हडप करतो की काय अशी भीती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आजही शेतकरी असणे समाजजीवनामध्ये फारसे सन्मान जनक मानले जात नाही आम्ही शेतकरी आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकत नाही आपल्या मुलाबाळांच्या मूलभूत गरजा पुरवण्यात कमी पडत आहे अशी भावना शेतकरी कुटुंबातील महिलांना सुद्धा वाटू लागले आहे त्यामुळे ग्रामीण भागात कारखान्यात अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या तरुण नवरा म्हणून मुली पसंत करतात पण तो शेतीत भरपूर उत्पादन करणाऱ्या शेतकरी तरुणाशी लग्न करायला नकार देतात कारण शेतकऱ्याच्या हाती उत्पादन येते पण त्याचे परिवर्तन भरपूर पैसात होईलच याची शाश्वती नसते त्यामुळे शेतात राबणाऱ्या पुरुषाबरोबर महिलावर्गाची संख्या ही कमी होऊ लागली आहे कमी होऊन मजुरीचा खर्चही वाढला आहे लहान लहान झालेली जमिनीचे तुकडे त्यातून निघणारे अल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागू शकत नाही एकंदरीत ह्या सर्व समस्या वरती शेती क्षेत्रावर बदल करायचं झाल्यास शरद जोशी यांच्या विचाराशिवाय हे होऊ शकत नाही. शेतीमध्ये एक मोठी क्रांती आल्याशिवाय हे शक्य नाही बाजारपेठेचा आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ही शरद जोशी यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे पण आजही सरकारचे डोळे उघडलेले नाहीत.

परिचय

सदस्याचे पूर्ण नाव
रामेश्वर उत्तमराव अवचर
जन्मतारीख
01/01/1980
लिंग
पुरूष
शिक्षण
१० वी
व्यवसाय
नोकरी
E-mail (विरोप)
ruawchar@rediffmail.com
शहर
पुणे
राज्य
महाराष्ट्र
देश
indian
आवडते कलाकार/लेखक/कवी

sharad joshi

कालावधी

खरडवही
खरडवहीतील नोंदी पाहा
सदस्य कालावधी
11 वर्षे 10 months