Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



एक “अनुभवसिद्ध रानमेवा"

प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

एक “अनुभवसिद्ध रानमेवा”

वर्धा हा महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा, पण बहूपरिचित अशी ही भूमी. सर्वच सेवा कार्यात अग्रेसर असा परिचय असलेली. ‘वरदा’ या पवित्र संतसंगी मायगंगेने आपले कृपेचे आवरण दिले म्हणूनच या जिल्ह्याला ’वर्धा’ हे नाव पडले. ही भूमीराष्ट्रपिता म.गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत विनोबा भावे यांच्या चरणस्पर्शाने व विचाराने पवित्र झालेली, म्हणूनच संपूर्ण देशात या जिल्ह्याचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय आहे. या जिल्ह्यात कवी,लेखक,कीर्तनकार, समाजसेवक, दानशूर कार्यकर्ते भरपूर आहेत.

याच जिल्ह्यात, हिंगणघाट तालुक्यात आर्वी (छोटी) हे छोटेसे गांव. ’छोटी’ या शब्दातच या गावाचे लडिवाळे प्रेम भरले आहे. श्रमाचे व्रत घेऊन जगणारे श्रमनिष्ठ शेतकरी असलेले हे गांव. या गावात एक कवी जन्माला आला. त्याचे नाव श्री गंगाधर मुटे. व्यवसायाने शेतकरी. श्रमनिष्ठेचे व्रत घेतलेला, बुद्धीमान, प्रारंभिक जीवनात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या. शेतकरी संघटनेच्या यशस्वी आंदोलनात त्यांना समाजाचा अभ्यास झाला. हा अभ्यासकेवळ बुद्धीवादातला नव्हता तर अनुभवातून आलेला होता, म्हणूनच त्यांची लेखनी कविता लिहिण्यास सिद्ध झाली व त्यातूनचत्यांच्यातल्या कवीने जन्म घेतला व आज एक “अनुभवसिद्ध रानमेवा” हा कविता संग्रह त्यांनी लिहिला. ह्या कविता आपण वाचत गेलो की आपले हृदय हेलकावे खाते व भावना सद्भावनेमध्ये रूपांतरित होऊन समाजाच्या सुखदु:खात एकरूप होतात. एवढी श्री मुटे यांच्यालेखणीची ताकद आहे. या संग्रहातील कविता समाजकार्याच्या प्रेरणा देतात. एवढा मोठा अधिकार श्री मुटे यांचा असतांना मला त्यांनीया पुस्तकासाठी अभिप्राय मागितला हे त्यांचे माझेवरील प्रेम होय. वास्तविक माझ्यात ही ताकद नाही पण फुलावर फुलपाखरू बसले की, फ़ुलाच्या रंगात थोडी का होईना पण भर पडते, असा हा प्रसंग आहे.

ह्या कविता घराघरात वाचल्या जाव्यात व त्यातून चारित्र्यसंवर्धन व व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण व्हावी हीच माझ्यासारख्याची अपेक्षा राहील. व्यक्तिमत्त्वविकासाशिवाय देशाची प्रगती होत नाही, देशाच्या विकासासाठी समर्पित व्यक्तिमत्त्वाची माणसं लागतात ती या कवितारूपी सुगंधातून घडावी एवढीच आशा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो.

प्रकाश महाराज वाघ

माजी सर्वाधिकारी
अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ,गुरूकुंज मोझरी
वर्धा : १०.१०.२०१०
...................................................................................................................

Share