पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
कविता
हवी कशाला मग तलवार ? मकरंदाहुनि मधुर तरीही शर शब्दांचे धारदार तळपत असता जिव्हा करारी हवी कशाला मग तलवार ?......!! शब्दच असती कवच कुंडले शब्दच चिलखत होती शब्दच होती आयुधे ऐसी नभास भेदुनि जाती शब्द खड्ग अन् शब्द ढालही परतवती ते हरेक वार.......!! नवनीताहून मऊ मुलायम कधी कणखर वज्रे आसवांनी भिजती पापण्या कधी खळखळ हसरे हीनदीनांचे सांत्वन करिती गाजविती दरबार....!! भुंग्यासम शब्दांची गुणगूण कधी व्याघ्राची डरकाळी शब्द फटाके, शब्द फुलझडी कधी नीरवता पाळी जोषालागी साथ निरंतर कधी विद्रोही फूत्कार ....!! सृजनशीलता-करुणा-ममता
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.