नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अहोरात्र शेतीत राबणाऱ्या बळीराजाच्या माथी नेहमी निराशाच येते.कारण निवडणूक झाल्यावर पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या प्रचारालाच येणारे राजकारणी जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार नाही तोपर्यंत भारत देश विकसित राष्ट्रांच्या यादीत गणला जाणार नाही.तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही थांबणार नाहीत.
लोकांकडून पैसे घेऊन प्रसंगी दुकानदाराकडून पाच ते दहा टक्क्यांनी शेकडा दराने बी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस न पडल्यामुळे जेव्हा दुबार पेरणीची वेळ येते तेव्हा ;त्याचा अनुभव एका खासदार,आमदार ला निवडणूक हरल्यानंतर आलेल्या अपयशाच्या अनुभवा पेक्षा सहस्र पटीने कितीतरी वरचढ असतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ओरडून देशाला सांगितले की खेड्याकडे चला या महान व्यक्तिमत्वाने देशासाठी एवढे योगदान दिले.त्यांचा चलनाच्या प्रत्येक नोटीवर छायाचित्र असते.ते जेव्हा खेड्याकडे चला असे म्हणतात तेव्हा सर्वांनी गोष्टीवर विचार करायला हवा.
आज बहुतांशी शेतकरीवर्ग कर्जाच्या विळख्यात इतका अडकलेला आहे की त्याला सहज वाटून जाते कि या जन्मी तरी यातून सुटका होणे शक्य नाही.
प्रत्येक निवडणूक वेळी मग ती विधानसभा असो वा लोकसभा असो; एक खूप मोठे अमिष शेतकऱ्यांना दाखवलं जातं. ते म्हणजे कर्जमाफीच. चालू सरकारने आतापर्यंत जी कर्जमाफी ची व्याख्या केली किंवा त्या अनुषंगाने जी योजना राबवली ती आणखी कुणाला पूर्णपणे कळलेली नाही.मग कशा आत्महत्या थांबणार?
जेव्हा एखाद्या वयात आलेल्या मुलीच्या लग्नासाठी उपाययोजना करताना कितीतरी जणांनी समोर तिच्या शेतकरी बापाला माथा टेकावा लागतो रान गहाण ठेवावं लागतं घरदार गुरंढोरं सुद्धा प्रसंगी विक्रीस काढावी लागतात एवढं करूनही जेव्हा पूर्ण खर्च उभा करता येत नाही तेव्हा तो खचून जातो आणि मग शेतकऱ्याला फाशीचा दोर जवळचा वाटू लागतो. हे टाळण्यासाठी शेतकर्यांकडे सरकारने ध्यान देणे फार गरजेचे आहे अन्यथा हा देश कृषीप्रधान आहे हे फक्त कागदोपत्री वाचायला मिळेल .जर या देशाला खरोखरच विश्वगुरु समृद्ध व सुखी बनवायचे असेल तर शेतकरी व त्याची शेती टिकली पाहिजे तर आणि तरच अर्थव्यवस्था टिकेल व बळीराजा सुखी होईल
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने