Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



जबाबदार कोण?

लेखनविभाग: 
छंदमुक्त कविता

जबाबदार कोण?

गर्वाने सांगतोय आम्ही,
'भारत कृषीप्रधान देश'!
खेद वाटतोय याचाच की;
याच देशात येतोय आज,
शेतकऱ्यांच्या तोंडाला फेस !!

डोई उभाय हिमालय कर्जाचा,
याशिवाय दुसरं काहीच नाही दिसत !
त्यात कधी फाटतं आभाळ....
तर कधी;
पाण्याचं टिपूसही नाही दिसत!!

आगडोंब उसळता भूकेचा,
शांत बसेल का हे टिचभर पोट
घरच्यांची उपासमार पाहून,
बळीराजा घेतोय विषाचा घोट !

ऐकतोय मी लहानपणापासूनच..
की एकेकाळी, याच देशी निघे सोन्याचा धूर !
पण...! आज वाहतोया येथेच...
शेतकऱ्यांच्या अश्रूंचा पूर!!

सदा राबतो हा बळीराजा,
पुरविण्या जगाला अन्नाचा घास
का आवळावा लागतोय त्यालाच आज,
आपुल्या गळ्याभोवती फास!!

सारं जीवनच फुटलया शेतकऱ्यांचं
मग...'किती'? नी 'कूठं-कूठं'?
जोडणार लिकेज
'कुंकवाचा धनी' गेल्यावर मिळतं...
सरकारचं कुरतडलेलं प्याकेज!!

बांगडी फुटते आहे रोजच...
कधी येणार सरकारला जाग ?
बापाला द्यावी लागतेय आज...
मुलाच्या चितेला आग!!

भ्रष्ट राजनितीनं पोखरलेली
ही 'लुळी पांगळी सरकारं'
ज्यांनी चालवलाया वर्षानूवर्षे...
गोर - गरीबांच्या जीवनाचा बाजार !!

भ्रष्ट नेत, सावकार, नि दलाल...
यांच्या घशात गेलयां, शेतकऱ्यांचं सारं धन!
फक्त ; चर्चांमद्धेच गुरफटलेला प्रश्न -
"शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार तरी कोण??"
विचारतोया एवढेच की ,"जबाबदार कोण... ????

©:-अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड पो. गांधीग्राम
ता. जि. अकोला 444006
Mo-9689634332
©Copyright Aniket Deshmukh

Share

प्रतिक्रिया