Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.



काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

'रानमेवा', हा गंगाधर मुटे यांचा कवितासंग्रह प्रकाशित होतोय, हे वाचून आनंद झाला.ह्या पहिल्या-वहिल्या संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

गंगाधर मुटे हे केवळ हाडाचेच नव्हे तर वर्‍हाडाचे-विदर्भाचे शेतकरी आहेत हे त्यांच्या कविता वाचल्या की ठळकपणे लक्षात येतं. त्यांच्या कवित्ता-गझलांमधून वर्‍हाडी-वैदर्भी बोलीचे अनेक शब्द येतात. तोंडवळा हरवलेल्या शहरी गर्दीत गावाकडचा माणूस अकस्मात भेटल्यावर होणारा हरीख अशा शब्दांनी मला भरभरून दिला आहे.अर्थात अशी शब्दपेरणी त्यांनी मुद्दाम केलेली नाही तर लिहिण्याच्या ओघात ते शब्द सहज आलेले आहेत.

शेती-मातीच्या कवितेतला आंतरिक ओलावा त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरतो. त्यामुळे ती कविता केवळ हवेतली न वाटता तिच्या पाळामुळांना झोंबलेल्या काळ्या मातीचा गंध शब्दाशब्दांतून जाणवतो.

‘असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी.’

अशा किती तरी ओळी मनात रेंगाळत राहतात.

मुक्तछंदाच्या आजकालच्या चलतीच्या काळात ‘सुमंदारमाला’ सारख्या वृत्तात लिहिण्याची जोखीम स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही.आणि त्या सोबत गझलसारख्या काव्यप्रकारातली त्यांची वाटचाल पाहिली की वाचकांनी त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवाव्या, हे स्वाभाविक आहे.

‘भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला अभय गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी.’

ही ‘भूमी’ अशीच पायाखाली आधाराला राहो.दिसामासानं वाढणार्‍या कवितेतलं नवखेपणाचं न्यून सरत जावो आणि मायबोलीचे हे नमन सुजलाम,सुफलाम होवो. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास-

‘जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो बायबोली!’

मन:पूर्वक शुभेच्छांसह

- डॉ.श्रीकृष्ण राऊत
अकोला

......... **.............. **............. **..............**............

Share