Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र

कवितेची बाराखडी आणि सौंदर्य विस्तार
 
जगाच्या पाठीवर सर्व चांगलेच असते. अर्थात सर्व कविताही चांगल्याच असतात. तरी पण चांगल्या कवितेला आणखी चांगले करणे मात्र सहज शक्य असते. चांगल्याला आणखी चांगले करायचे असेल तर ते मात्र सहज शक्य नसते. त्यासाठी परिश्रमाची आवश्यकता असते आणि परिश्रम घ्यायचे असेल तर त्यासाठी प्राथमिक माहितीचा स्रोत उपलब्ध असावा लागतो.
 
कविवर्य सुरेश भटांनी गजलेची बाराखडी लिहिली आणि महाराष्ट्रभर हजारो मराठी गझलकार उदयास आले. गजलेच्या तंत्र आणि मंत्रावर शास्त्रशुद्ध अधिकारवाणीने भाष्य करू शकेल, अशा शेकडो मार्गदर्शकांची फळी तयार झाली. कवितेच्या बाबतीत मात्र अशी कवितेची बाराखडी वगैरे उपलब्ध असल्याचे माझ्या अजून निदर्शनास आलेले नाही. 
 
शेती साहित्य कसदार, रसदार आणि आणखी दर्जेदार निर्माण होण्यासाठी अशा प्राथमिक समकक्ष बाराखडीची गरज आहे, असे माझे मत झालेले आहे. म्हणून कविता कशी असावी, कविता कशी नसावी, कविता कशी लिहावी, कवितेची रचना, प्रारूप, आशय वगैरे कसा असावा, या संदर्भात शेती सारस्वतांचा एल्गार या व्हाट्सअप ग्रुप वर चर्चात्मक ऊहापोह करण्याचे ठरले आहे. 
 
पहिल्या टप्प्यात कवितेच्या रचनात्मक अंगाच्या दृष्टीने आजवर जे काही लेखन झाले, स्फुट लेखन झाले, एकच दुकट वाक्यात सुद्धा काही मतप्रदर्शन झाले असेल तर त्याचा शोध घेऊन ते या ग्रुपवर त्याला जमेल तसे पोस्ट करावे आणि त्यावर चर्चा करावी, अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे.
 
पुरेशी माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याचा या ग्रुपवरिल सभासदांना उपयोग तर होईलच पण त्यासोबतच शक्य झाले तर सर्व माहिती आपण एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात सुद्धा कदाचित प्रकाशित करू शकू.
 
आपला स्नेहांकित
- गंगाधर मुटे
------------