![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
जेव्हा जेव्हा झाली अवकृपा तोंडचे पाणी पळाले
सवय झाली जिंदगीला कित्येक मोती असे गळाले ||धृ||
व्यवस्था तर भलतीच चालली आहे माजत
धर्म असुन नाही कुणी कुणास पाणी पाजत
लुटारुही आम्हा नाही लुटण्यासाठी लाजत
ढिले झाले तार आता विणाही नाही वाजत
कितीतरी ओले जीव असेच विनाकारण जळाले||१||
झुंजलो वादळाशी प्राणज्योत नाही विझत
पाऊस पडतोय असा की अंग नाही भिजत
थकलेत सारे शरीर तरी डोळे नाही निजत
आपलीच डाळ आपल्या घरी नाही शिजत
भांडवलशाहीच्या जात्यात मजूर लागलेत दळाले||२||
लागवडीचा खर्चही आता नाही शेती काढत
डोंगर कर्जाचा दिवसेंदिवस चालला वाढत
मरणघडी येईस्तोवर राहायचे असेच नाडत
शासनयंत्रणा जित्यापनीच आहे आम्हा गाडत
या गंभीर विकाराला सरकारने वरपांगी पडताळले||३||
शोधतो प्रीतीची किरणं कुठे पाझरततात
अश्रूंच्या थेंबातून कशी काव्य उमलतात
वाट बघतोय कोण आम्हाला हृदय देतात
नव्यानेच श्वासांची नवी भेट घेऊन येतात
मृत्यू कुणा आवडतो जर जीवनाचे दान मिळाले||४||
प्रतिक्रिया
मोती असे गळाले..
मस्त रचना, धिरजकुमार!
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद!
आभार डॉ साहेब!
मोती असे गळाले
छान कविता आहे वाचायला आवडेली
धन्यवाद!
आवडलीना!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
जबरदस्त
अतिशय जबरदस्त गीत आहे सर.
मुक्तविहारी
मोती असे गळाले..
मृत्यु कुणा आवडतो! वा अप्रतिम असे काव्य!!
Pradip
धन्यवाद!
आभार प्रदीप थूल साहेब.
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप