पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
माझी गझल निराळी
तरी हुंदक्यांना गिळावे किती?
झणी झोत येती तुझ्या आठवांचे, सयेचे उमाळे छिपावे किती? बळे रोखतो मी जरी आसवांना, तरी हुंदक्यांना गिळावे किती?
कधी चाललो मी तुझ्या पावलांनी, कधी बोट हातात होते तुझे तशी सांज येणार परतून कैसी, मनी प्राक्तनाने झुरावे किती?
जरी देह-काया चिरंजीव नाही, तळे भावनांचे तरी साचते जरी घालतो बांध मी या तळ्यांना, हृदय फ़ाटतांना तुणावे किती?
जगी जीव अब्जो जरी नांदताती, फ़ुलांच्या-फ़ळांच्या डहाळ्या दिसे परी शोधताहे नजर का तुला बा! स्मृतींचे खुमारे भुलावे किती?
’अभय’ विरह येतो नशीबी कुणाच्या, कुणाचेच दुर्भाग्य तैसे नसो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.