पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
काव्यधारा
नागपुरी तडका
कुठे बुडाला चरखा?
राजकर्यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता काय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
इंग्रज होते, लुटत होते, येथील कच्च्या माला पक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला काय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
रेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते कोर्ट-कचेर्या अन नोकर्या, त्याही गोर्या हस्ते काय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.