पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझे फेसबूक स्टेटस - 2
गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी?
शेतकरी तितुका एक एक!
"प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण
#शुभरात्री_लोक्सहो #धर्म
राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.
इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी आमच्याच घशात घाला... भारत मेला तरी चालेल.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.
शेतीव्यवसाय मुख्यत्वे ज्या जातींच्या हाती आहे दुर्दैवाने त्याच जातींना "जातीच्या राजकारणाचे" प्रचंड वेड आहे.
पूर्वी लेख पाठवायचो तर ते छापत नव्हते. आता संपादक फोन करून लेख मागतात आणि मला वेळ नाही.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
माझ्या जन्मदिवशी (२७ फेब्रू) मराठीला अभिजात दर्जा मिळाला असता ... तर सोन्याहून पिवळे झाले असते. सरकारचे अभिनंदन! #गंगाधर_मुटे
भारताचे शस्त्र अर्थात आंदोलनशास्त्र
मी अमुक-अमुक पक्षाला कधीही मतदान करणार नाही, असे म्हणणे आंदोलन शास्त्रात बसत नाही. तसेच एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारणे सुद्धा आंदोलन शास्त्रात बसत नाही.
.... कारण एकदा जर एखाद्या पक्षाला खात्री झाली कि तुम्ही कधीच त्यांना मतदान करणार नाहीत तर तुमच्याविषयीची त्या पक्षाची अनुकूलता संपुष्टात येईल. आणि ....... ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणारच आहात अशी खात्री होईल तो पक्ष तुम्ही त्यांच्या खुंट्याला बांधलेलेच आहात असे गृहीत धरून तुमच्याविषयीची त्या पक्षाचीही अनुकूलता सुद्धा संपुष्टात येईल.
याउलट तुम्ही जर शेतीला अनुकूल धोरणे राबवलीत तर मतदान मी तुमच्याच पक्षाला देणार, असे लालूच देणारे संभाषण करत सर्वच पक्षांना झुलवत ठेवून त्यांना आपल्या बोटावर खेळवत ठेवले तर.... तेच आंदोलनाच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
व्यक्तिगत मताला बाजूला ठेऊन शेतीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारा विचारच सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे आंदोलनशास्त्र आणि व्यक्तिगत वर्तनशास्त्र कधीही एकत्र येत नाही, हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलनाच्या पाईकाने संघटनेचा सामूहिक निर्णय स्वीकारलाच पाहिजे.
मी बहुतांश वेळा भाजपलाच मतदान केले आहे. अन्य पक्षांना फारच कमी वेळा. पण भाजप हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त घातक पक्ष असल्याची माझी खात्री झाली तर मी प्रतिस्पर्धी- तुल्यबळ उमेदवारालाच मतदान करेन. मग मला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, रिपाई, तेलगू देसम, वंचित आघाडी आणि मुस्लिम लीग सहित कोणताही पक्ष चालेल. पण शेतकरी संघटना जसा निर्णय घेईल त्यानुसार मी मतदान करत असतो. मतदान करताना स्वतःचे डोके वापरत नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
पाऊस पडला कि बेडकं जिवंत होतात अन पाऊस पडला नाही कि पर्यावरणवादी जिवंत होऊन "झाडे लावा, झाडे लावा" असे डराव डराव करायला लागतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले! #शुभरात्री_लोक्सहो #पर्यावरण #गंगाधर_मुटे #इंडियाvsभारत #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडा, झाडे विका.... असे धोरण का असू नये रे दीडशहाण्याने??
#तुत्ते-तमिने-हलामी-थाले #शुभरात्री-लोक्सहो
पोटासाठी बारा वाटा.. पण सद्यस्थितीत 12 पैकी बाराही वाटा फक्त शहरांकडेच जातात आणि थांबतात.
#इंडियाvsभारत #शुभरात्री_लोक्सहो
राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. सरकारने नको ते खुटीउपड धंदे करू नये. सर्व पांढरे हत्ती विकून काँग्रेसने केलेली चूक दुरुस्त करावी. हाच जनहिताचा राजमार्ग आहे.
#गंगाधर_मुटे #अर्थशास्त्र
सरकार जर शेतीविरोधी नसेल तर वादळ, अतिवृष्टी, महापुर शेतकऱ्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!
एका वृक्षात सरासरी पाच माणसे जाळली जाऊ शकतात. आतापर्यंत ६ लक्ष शेतकऱ्यांनी अल्पवयात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना जाळायला निदान सव्वा लक्ष वृक्ष निष्कारण खर्ची पडले आहेत. याचाच अर्थ सव्वा लाख वृक्षांची निष्कारण कत्तल करावी लागली आहे.
पर्यावरणवाद्यांना शेतकरी मेल्याचे दुःख नाही, हे मी समजू शकतो पण सव्वा लक्ष वृक्षांची कत्तल थांबवण्यासाठी तरी त्यांनी शेतकरी आत्महत्त्या थांबवायसाठी प्रयत्न करणे आवश्यक नव्हते का? #सांगा_ब्वॉ
#तुत्तेतमिने_हलामीथाले! #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
धर्मवादी आणि जातीवादी हेच आजचे रावण आहेत. पण त्यांची संख्या 95% आहे. त्यांना पेटवायचे कसे?
त्यामुळे शुभेच्छा
व्यवस्था परिवर्तन करायला निघालेले स्वतःच आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेत शिरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहेत का?
आयला तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून असाल तर तुमच्यासारखा विश्वव्यापी सदासुखी राजा कुणीच नाही राव! प्रसंग कोणताही, निमित्त कोणतेही, घटना कोणतीही असली तरी तुम्हाला स्वतःचे डोके चालवायची गरजच नाही. डोक्याला ताप द्यायची तर अजिबात गरज नाही. अभ्यास करून विचारपूर्वक बोलायची गरज तर अजिबातच नाही. काँग्रेसचे असाल तर काँग्रेसेतर पक्षांना शिव्या घालायच्या आणि भाजपचे असाल तर भाजपेतर पक्षांना शिव्या घालून मोकळे व्हायचे. तुमचा नेता म्हणेल तेच अंतिम सत्य! तुमचा पक्ष देईल तोच अंतिम न्याय!! तुम्ही फक्त सुरात सूर मिसळून री ओढायची. बस्स!!!
खरंच सांगा राजेहो! तुमच्याइतका सदासुखी बादशहा दुसरा कोणी असेल का या संबंध विश्वात?
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #राजकारण #तर्कशास्त्र
माझी फेसबुक स्टेटस
फेसबूक पोस्ट
शेतीची लढाई आक्रमकपणे लढताना अत्रतत्रसर्वत्र मी माझ्या शत्रूची फौज निर्माण करून ठेवली आहे.
राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून थोडासा विचार करावा.
आपल्या देशात जात आणि धर्म असे पिंजरे करून ती ती जात आणि तो तो धर्म स्वतःला स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी पिंजऱ्यामध्ये अडकवून घेतो. पिंजऱ्याच्या बाहेर पडून स्वतःला व्यापक करण्याची इच्छाशक्ती जातीचा गर्व असणाऱ्यांना आणि धर्माचा गर्व असणाऱ्यांना नसते.
त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला आणि एक धर्म दुसऱ्या धर्माला मतदान करण्यास तयार नसतो.
जर राजकीय यश मिळवायचे असेल तर या चौकटीच्या बाहेर पडून एकमेकात मिसळावे लागेल. एकमेकांची मने जिंकावी लागतील. जाती आणि धर्माच्या बाहेरील मतदार आपल्याला मतदान करेल अशी वर्तणूक करावी लागेल. असे करताना कोणी दिसत नाही.
कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट देणार. यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना तिकीट देऊन कोणीही आपल्या पक्षाचा वाटोळ करून घेणार नाही.
जे बहुसंख्या आहेत त्यांना जात आणि धर्म दोन्ही परवडतात. त्यामुळे ते जाती-धर्माचे पिंजरे निर्माण करतात.
जो धर्म आणि ज्या जाती अल्पसंख्या आहेत त्यांना असे पिंजरे तयार करून त्यात बंदिस्त होणे राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि कदाचित हजारो वर्षानंतरही चित्र बदलणार नाही.
बहुसंख्य करतात म्हणून त्यांचेच अनुकरण करून आपणही स्वतःला जाती धर्मात बंदिस्त करून घेण्यात अल्पसंख्याकाचा मोठा घात होतो.
शेतकरी जर सक्षम झाला आणि आर्थिक संपन्न झाला तर *देवाघेवीच्या अटी* शेतकऱ्यांच्या हाती जातील. त्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल. चांगला भाव मिळेपर्यंत तो शेतमाल विकणार नाही.
जर असे झाले तर शेतमाल स्वस्तात स्वस्त भावांने लुटणे शक्यच होणार नाही. *म्हणून शेतकऱ्याला कायमच "गरजू" ठेवणे आणि त्याला कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे* हेच सरकार नामक राज्यकर्त्यांचे अधिकृत धोरण असते.
पक्ष, पक्ष नेते, उमेदवार राजकारण करिअर म्हणून करतात. मतदारांनी मतदान करिअर म्हणून करावे का?
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी का दिली जाते? #तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा आणखी किती राजकीय सत्यानाश व्हायला पाहिजे म्हणजे हे पुरोगामी सुधारतील?
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू गरिबी का आली ते तरी शोधून बघू
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत जा, भोकात जा हे ग्रामीण भागात सहज वापरले जाणारे ग्राम्य शब्द असले तरी फक्त गावंढळ लोकच वापरत असतात.
#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
पूर्वी अज्ञानी लोकांना भूत-प्रेत-पिशाच्च झपाटायचे; आता ज्ञानी-विज्ञानी लोकांना राजकिय पक्ष आणि नेते झपाटून टाकतात. दोन्ही स्थिती एकसमान. गुणात्मक फरक काही नाही.
आज पाण्याच्या नळाच्या नळीतून पाण्याच्या धारेची धार न आल्याने आंघोळ धुवायची राहून गेलेली आहे.
सनातनी व पुरोगामी यांच्या कट्टरपंथी अतिरेकापेक्षा मतदारांना मोदींचा मध्यममार्गी देशधर्म जास्त भावला, हे खरे आहे.
© गंगाधर मुटे
विज्ञानवादी अभ्यास त्याचा, इतका विकसित झाला पिकवतोय म्हणे टक्कलावर तो, हिरवा भाजीपाला
HTBT तंत्रज्ञानाला विरोध करतात अन स्वतःला विज्ञानवादी समजतात. #तुत्ते_तमिने_हलामी_थाले!
फक्त एका बाजूची विनंती न ऐकता वटवृक्षाने नवऱ्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.
#काय_म्हंता_लोक्सहो
"नासुकली" या बोलीभाषेतील शब्दाला समर्पक व तितकाच स्पष्ट अर्थबोध देणारा प्रमाणभाषेतील पर्यायी शब्द सुचवा. #RVKR
शेतातील वीज कापायला काल पवार-ठाकरेंचे कर्मचारी यायचे. यानंतर कदाचित फडणवीस-शिंदेंचे कर्मचारी येतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता.
#वाजवा_टाळ्या_आणि_झोपा #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
केवळ शेतकरी विरोधी कायदेच नव्हे तर कायद्याचे जंगलच संपवणे आवश्यक आहे. म्हैस मनभर अन शिंगे टणभर.
आमच्याकडे 'पाऊस' कधीच येत नाही, नेहमी 'पानी' येत असतो. आज पण बऱ्यापैकी 'पानी' आला.
तुमच्याकडे काय येतो? पाऊस की पानी? #गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
'भूक लागणे' हा रोग आहे आणि 'अन्न' हे त्यावरचे औषध आहे, जे आयुर्वेदिक आहे. #RVKR
अलोपॅथी की आयुर्वेद श्रेष्ठ या वादात गुरफटण्यापेक्षा माणसं वाचवण्याला प्राथमिकता देण्याची माणुसकी माणसात का असू नये? #RVKR
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
देरेनवेन्द्राचे सरकार म्हणजे "बंदीबाज" सरकार.
आता इलॅस्टीकवरही बंदी आणा म्हणावं. रस्त्याने चालताना घसरलेले पॅन्ट सावरत शाळेत चाललेली लेकरं बघायची मला ओढ लागली आहे.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो. चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच. शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची औकात नाहीये कारण पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती
तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे. "मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!
शेतकरी संघटना ही एकमेव चळवळ आहे जी तर्कशुद्ध बावनकशी वैचारिक पायावर मार्गक्रमण करत आहे. यु. शरद जोशींनी मांडलेले शेतीचे अर्थशास्त्र व त्या अनुषंगाने अंगीकारावे लागणारे आंदोलनशास्त्र शास्त्रीय आणि तार्किक पातळीवर कोणालाही आजवर खोडून काढता आलेले नाही. पण बेरकी लोक नाव तर शरद जोशींचे घेतात पण यु . शरद जोशींचे तत्वज्ञान उलटे टांगणारे कार्य करत राहतात. मी त्यांचा निस्सीम अनुयायी आहे असाही आव आणत राहतात.
त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा घात होतो आणि आंदोलन चार पावले पुढे जाण्याऐवजी चार पावले मागे जाण्याची भीती उत्पन्न होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #आप्ल्याले_गधं_घोडं_सारखंच #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
वडाचे झाड प्रचंड ऑक्सिजन देते हे त्या काळात सावित्रीला कळले होते... इतके तिचे विज्ञानावर प्रभुत्व असण्याची शक्यता आहे. तिला मेलेला नवरा जिवंत करण्याचे सायन्स त्या काळात अवगत असेल म्हणून तर तिने वडाच्या झाडाची निवड केली नसेल?
तसे असेल तर त्या काळातील विज्ञानाच्या तुलनेत आजचे विज्ञान फारच मागासलेले आणि चिल्लर स्वरूपाचे आहे असे म्हणावे लागेल. ===== प्राणप्रिय व्यक्तीचा (नवरा सुद्धा त्यात आला) सात जन्म सहवास मिळावा ही उत्तुंग प्रेमभावना आहे आणि ती भावना प्रदर्शित करण्यासाठी वटपूजा हे माध्यम आहे.
एका सावित्रीबाईने स्त्रियांना शिक्षण दिले. त्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करण्याऐवजी चाणाक्ष महिलांनी चांगला, गलेलठ्ठ पगारवाला व देखणा नवरा मिळावा म्हणून केला. सावित्रीबाई फुलेंना उलटे टांगून वरून पुन्हा आम्ही पुरोगामी (अर्थात विज्ञानवादी सुद्धा) असल्याचा बडेजावही मिरवला.
एका जोतिबांच्या सावित्रीचा मदतीने शिक्षण घेऊन चांगला नवरा मिळवणे व दुसऱ्या सत्यवानाच्या सावित्रीच्या मदतीने तोच नवरा सात जन्म टिकावा म्हणून मग वटपूजा करणे...... हे चक्क मानसशास्त्रीय, गणितीय विज्ञान आहे. ज्यांना यात अंधश्रद्धा दिसते ते अविज्ञानी बैताडबेलने असतात. #गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
सृष्टी से पहले पृथ्वी नहीं थी, सूरज-चांद भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, तुम भी नही... केवल अकेला मै था! परेशान था!! आता तुमच्या संगतीने दिवस मजेत जातो.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #RVKR
"तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी" उथळ विज्ञानवादी हे विधान विज्ञानात कसे बसवणार? संवैधानिक मान्यता कशी देणार?
आम्ही शेतकरी झाडे लावतो आणि झाडे तोडतो सुद्धा! कारण आम्ही कृतीशील कर्मयोगी आहोत. नुसते तोंडाने वाफ़ उडवणारे बोलघेवडे पर्यावरण वादी/प्रेमी/तज्ज्ञ नाहीत. तोंडाची वाफ़ दवडल्याने कुठे निसर्गाच्या आगगाडीचे इंजिन चालत असते?
पुरोगामी इतके थयथयाट करत आहेत की जणू जोतिष्यशास्त्राला मान्यता दिली तर पुरोगाम्यांचे दुकानच बंद पडणार आहे!
#गंगाधर_मुटे
भंपकपणा, पाखंडीपणा व ढोंगीपणा... काही धार्मिक, निधार्मिक, साधूबुवा, महाराज, सनातनी, पुरोगामी, आस्तिक, नास्तिक यांच्यामध्येही असतो. सर्वात कहर म्हणजे स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे सर्वात भयंकर पाखंडी असतात. त्यांना कवडीचेही विज्ञानाचे ज्ञान नसते.
#गंगाधर_मुटे #अनुभवशास्त्र
युगात्मा शरद जोशींसारखे आम्ही मॅचविनर खेळाडू नाहीत, हे खरे आहे पण आपापल्या क्षमतेनुसार जमेल तितके रन काढून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे खेळाडू नक्कीच आहोत.
सर्व आजी-माजी-जुन्या-पुराण्यासहित नव्या दमाच्या होनहार खेळाडूंना विनंती आहे कि त्यांनी पॅव्हेलियन/ प्रेक्षकगॅलरीमधून मैदानात यावे. कर्णधार Anil Ghanwat यांचे नेतृत्वात मॅच जिंकू किंवा हरू पण संघर्ष तर नक्कीच करू, करत राहू. कटिबद्ध खेळाडूंच्या समर्पित खेळातूनच ट्रॉफीवर हक्क नोंदवायचा मार्ग जाऊ शकतो.!!!
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~ : डिस्क्लेमर : १) काही खेळाडूंना खेळाडू म्हणून खेळ दाखवण्यापेक्षा कर्णधार पदाची जन्मजात लालसा असते. त्या लालसेपोटी ते टीम मध्ये भांडणे लावून/फूट पाडून आपल्या समर्थकांचा गट करण्यात वस्ताद असतात. त्यांना मॅच जिंकण्यात वगैरे अजिबात रस नसतो. येनकेन प्रकारेन आपल्याला कर्णधार पद कसे मिळेल या अविचाराने पछाडलेले असल्याने ते सतत कर्णधाराविरुद्ध कारवाया करण्यात गुंतलेले असतात. अशांनी कृपया आमच्यात मिसळू नये. मात्र ज्यांना धीर धरता येतो त्यांचे स्वागत असेल कारण आमच्या टीमचा कर्णधार दर दोन वर्षांनी बदलत असतो. कुणीही आपली कर्तबगारी सिद्ध केल्यास भविष्यात त्यांचे हाती कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची नैसर्गिक संधी असते. आम्ही दर दोन वर्षांनी सक्षम कर्णधाराच्या शोधात असल्याने कर्णधार पदायोग्य सक्षम खेळाडूचे अधीक पर्याय उपलब्ध झाल्यास आम्हाला त्याचा आनंदच वाटेल.
२) काही खेळाडू स्वतःला महान खेळाडू समजतात. प्रत्यक्षात ते खेळाडूच नसतात. त्यांना बॅट-बॉल हातात धरता येतच नाही पण साधे क्षेत्ररक्षण करण्याची देखील त्यांची कुवत नसते. मात्र त्यांची जीभ प्रचंड वेगवान गतीने चालत असल्याने ते अहोरात्र प्रशिक्षकाच्या भूमिकेत वावरत असतात. संपूर्ण टीमने त्याच्या इशाऱ्यानुरूप कार्य करावे, असा त्यांचा अट्टाहास असतो. कृपया त्यांनी लक्षात घ्यावे कि आमची कार्यकारिणीच आमची प्रशिक्षक असते. आमची टीम लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने काय निर्णय व्हायचे ते कार्यकारिणीत कधी एकमताने तर कधी बहुमताने होत असतात. ते सर्वांना बंधनकारक असतात. कार्यकारिणीत सर्वांना आपले विचार ठेवण्याची संधी असते. तिथे आपले विचार मांडून प्रत्येकजण संधीचा लाभ घेऊ शकतो.
~~~~~~~~~ ता. क : हे ललित लेखन असून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा या लेखनासोबत काहीही संबंध नाही. काही बाबी सुसंगत जाणवल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ~~~~~~~~~
सध्या शेतकरी आंदोलन फुल फॉर्मात आहे. पण खेळाडू दुर्दैवाने "चौफेर गोलंदाजी" करत आहेत. त्यामुळे सरकारी फलंदाजी नाबाद राहून कायमच खेळपट्टीवर पाय रोवून टिच्चून उभी आहे.
फलंदाजी चौफेर करायची असते. गोलंदाजी नेमकी विकेटच्या दिशेने करायची असते. खेळाडूंना हे मर्म जेव्हा कळेल तेव्हाच ही मॅच निर्णयाच्या व जिंकण्याच्या दिशेने जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.
- गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
01/10/2024
गायीच्या पालन-पोषणासाठी एका गाईमागे दरमहा रु. 5000/- सरकारने दिले पाहिजे. तुमची माय शेतकऱ्यांनी का पोसावी?
शेतकरी तितुका एक एक!
गंगाधर मुटे बुध, 02/10/2024
"प्रत्येक जीवजंतूंचा धर्म वेगवेगळा व ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असतो." - भगवान श्रीकृष्ण
#शुभरात्री_लोक्सहो #धर्म
शेतकरी तितुका एक एक!
02/10/2024
राज्यमातेला मतदानाचा अधिकार असता तर ती सुद्धा 1500 वाली "लाडकी माय" झाली असती.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
30/09/2024
शेतकऱ्याला "राज्यगुलाम" घोषित करा. बास्स! इतकंच बाकी राहिलेलं आहे.
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
26/09/2024
इंडिया म्हणतो अख्खी शासकीय तिजोरी
आमच्याच घशात घाला...
भारत मेला तरी चालेल.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
25/09/2024
देशावर आणि राज्यावर झालेले कर्ज जनहिताच्या योजना मुळे नव्हे तर वेतन आयोगामुळे झालेले आहे.
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
३ १ /० ९ /२ ० २ ४
शेतकरी तितुका एक एक!
० २ /१ ० /२ ० २ ४
शेतीव्यवसाय मुख्यत्वे ज्या जातींच्या हाती आहे दुर्दैवाने त्याच जातींना "जातीच्या राजकारणाचे" प्रचंड वेड आहे.
शेतकरी तितुका एक एक!
03/10/2024
पूर्वी लेख पाठवायचो तर ते छापत नव्हते. आता संपादक फोन करून लेख मागतात आणि मला वेळ नाही.

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
03/10/2024
माझ्या जन्मदिवशी (२७ फेब्रू) मराठीला अभिजात दर्जा मिळाला असता ... तर सोन्याहून पिवळे झाले असते. सरकारचे अभिनंदन!
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
04/10/2024
भारताचे शस्त्र अर्थात आंदोलनशास्त्र
मी अमुक-अमुक पक्षाला कधीही मतदान करणार नाही, असे म्हणणे आंदोलन शास्त्रात बसत नाही. तसेच एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारणे सुद्धा आंदोलन शास्त्रात बसत नाही.
.... कारण एकदा जर एखाद्या पक्षाला खात्री झाली कि तुम्ही कधीच त्यांना मतदान करणार नाहीत तर तुमच्याविषयीची त्या पक्षाची अनुकूलता संपुष्टात येईल.
आणि
....... ज्या पक्षाला तुम्ही मतदान करणारच आहात अशी खात्री होईल तो पक्ष तुम्ही त्यांच्या खुंट्याला बांधलेलेच आहात असे गृहीत धरून तुमच्याविषयीची त्या पक्षाचीही अनुकूलता सुद्धा संपुष्टात येईल.
याउलट तुम्ही जर शेतीला अनुकूल धोरणे राबवलीत तर मतदान मी तुमच्याच पक्षाला देणार, असे लालूच देणारे संभाषण करत सर्वच पक्षांना झुलवत ठेवून त्यांना आपल्या बोटावर खेळवत ठेवले तर.... तेच आंदोलनाच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.
व्यक्तिगत मताला बाजूला ठेऊन शेतीला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारा विचारच सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकतो. त्यामुळे आंदोलनशास्त्र आणि व्यक्तिगत वर्तनशास्त्र कधीही एकत्र येत नाही, हे कायमच लक्षात ठेवले पाहिजे. आंदोलनाच्या पाईकाने संघटनेचा सामूहिक निर्णय स्वीकारलाच पाहिजे.
मी बहुतांश वेळा भाजपलाच मतदान केले आहे. अन्य पक्षांना फारच कमी वेळा.
पण भाजप हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त घातक पक्ष असल्याची माझी खात्री झाली तर मी प्रतिस्पर्धी- तुल्यबळ उमेदवारालाच मतदान करेन. मग मला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, रिपाई, तेलगू देसम, वंचित आघाडी आणि मुस्लिम लीग सहित कोणताही पक्ष चालेल.
पण
शेतकरी संघटना जसा निर्णय घेईल त्यानुसार मी मतदान करत असतो. मतदान करताना स्वतःचे डोके वापरत नाही.
- गंगाधर मुटे आर्वीकर
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक स्टेटस 05/10/2024
गल्लीत झित्रुबांनो घुसलेत मांसप्रेमी
व्हा सज्ज बैल बांनो लेकीस वाचवाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
Fece book status 05/10/2024
पाऊस पडला कि बेडकं जिवंत होतात अन पाऊस पडला नाही कि पर्यावरणवादी जिवंत होऊन "झाडे लावा, झाडे लावा" असे डराव डराव करायला लागतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले! #शुभरात्री_लोक्सहो #पर्यावरण #गंगाधर_मुटे #इंडियाvsभारत #जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते
शेतकरी तितुका एक एक!
एकाचा प्रश्न :- मग झाडे
शेतकरी तितुका एक एक!
07/10/2024
झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडा, झाडे विका.... असे धोरण का असू नये रे दीडशहाण्याने??
#तुत्ते-तमिने-हलामी-थाले #शुभरात्री-लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
पोटासाठी बारा वाटा.. पण
पोटासाठी बारा वाटा.. पण सद्यस्थितीत 12 पैकी बाराही वाटा फक्त शहरांकडेच जातात आणि थांबतात.

#इंडियाvsभारत #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
09/10/2024
राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. सरकारने नको ते खुटीउपड धंदे करू नये. सर्व पांढरे हत्ती विकून काँग्रेसने केलेली चूक दुरुस्त करावी. हाच जनहिताचा राजमार्ग आहे.
#गंगाधर_मुटे #अर्थशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
11/10/2024
सरकार जर शेतीविरोधी नसेल तर वादळ, अतिवृष्टी, महापुर शेतकऱ्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही!
शेतकरी तितुका एक एक!
11/10/2024
एका वृक्षात सरासरी पाच माणसे जाळली जाऊ शकतात. आतापर्यंत ६ लक्ष शेतकऱ्यांनी अल्पवयात आत्महत्या केल्या आहेत. त्यांना जाळायला निदान सव्वा लक्ष वृक्ष निष्कारण खर्ची पडले आहेत. याचाच अर्थ सव्वा लाख वृक्षांची निष्कारण कत्तल करावी लागली आहे.
पर्यावरणवाद्यांना शेतकरी मेल्याचे दुःख नाही, हे मी समजू शकतो पण सव्वा लक्ष वृक्षांची कत्तल थांबवण्यासाठी तरी त्यांनी शेतकरी आत्महत्त्या थांबवायसाठी प्रयत्न करणे आवश्यक नव्हते का? #सांगा_ब्वॉ
#तुत्तेतमिने_हलामीथाले! #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
12/10/2024
धर्मवादी आणि जातीवादी हेच आजचे रावण आहेत. पण त्यांची संख्या 95% आहे. त्यांना पेटवायचे कसे?
त्यामुळे शुभेच्छा
शेतकरी तितुका एक एक!
13/10/2024
व्यवस्था परिवर्तन करायला निघालेले स्वतःच आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेत शिरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहेत का?
शेतकरी तितुका एक एक!
16/10/2024
आयला तुम्ही कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवून असाल तर तुमच्यासारखा विश्वव्यापी सदासुखी राजा कुणीच नाही राव! प्रसंग कोणताही, निमित्त कोणतेही, घटना कोणतीही असली तरी तुम्हाला स्वतःचे डोके चालवायची गरजच नाही. डोक्याला ताप द्यायची तर अजिबात गरज नाही. अभ्यास करून विचारपूर्वक बोलायची गरज तर अजिबातच नाही. काँग्रेसचे असाल तर काँग्रेसेतर पक्षांना शिव्या घालायच्या आणि भाजपचे असाल तर भाजपेतर पक्षांना शिव्या घालून मोकळे व्हायचे.
तुमचा नेता म्हणेल तेच अंतिम सत्य!
तुमचा पक्ष देईल तोच अंतिम न्याय!!
तुम्ही फक्त सुरात सूर मिसळून री ओढायची. बस्स!!!
खरंच सांगा राजेहो!
तुमच्याइतका सदासुखी बादशहा दुसरा कोणी असेल का या संबंध विश्वात?
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #राजकारण #तर्कशास्त्र
माझी फेसबुक स्टेटस
शेतकरी तितुका एक एक!
Fece book status 17/10/2024
फेसबूक पोस्ट
शेतीची लढाई आक्रमकपणे लढताना अत्रतत्रसर्वत्र मी माझ्या शत्रूची फौज निर्माण करून ठेवली आहे.

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24/10/2024
राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून थोडासा विचार करावा.
आपल्या देशात जात आणि धर्म असे पिंजरे करून ती ती जात आणि तो तो धर्म स्वतःला स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी पिंजऱ्यामध्ये अडकवून घेतो. पिंजऱ्याच्या बाहेर पडून स्वतःला व्यापक करण्याची इच्छाशक्ती जातीचा गर्व असणाऱ्यांना आणि धर्माचा गर्व असणाऱ्यांना नसते.
त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला आणि एक धर्म दुसऱ्या धर्माला मतदान करण्यास तयार नसतो.
जर राजकीय यश मिळवायचे असेल तर या चौकटीच्या बाहेर पडून एकमेकात मिसळावे लागेल. एकमेकांची मने जिंकावी लागतील. जाती आणि धर्माच्या बाहेरील मतदार आपल्याला मतदान करेल अशी वर्तणूक करावी लागेल. असे करताना कोणी दिसत नाही.
कोणताही राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट देणार. यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना तिकीट देऊन कोणीही आपल्या पक्षाचा वाटोळ करून घेणार नाही.
जे बहुसंख्या आहेत त्यांना जात आणि धर्म दोन्ही परवडतात. त्यामुळे ते जाती-धर्माचे पिंजरे निर्माण करतात.
जो धर्म आणि ज्या जाती अल्पसंख्या आहेत त्यांना असे पिंजरे तयार करून त्यात बंदिस्त होणे राजकीय दृष्ट्या कधीही परवडणारे नाही. आजही नाही, उद्याही नाही आणि कदाचित हजारो वर्षानंतरही चित्र बदलणार नाही.
बहुसंख्य करतात म्हणून त्यांचेच अनुकरण करून आपणही स्वतःला जाती धर्मात बंदिस्त करून घेण्यात अल्पसंख्याकाचा मोठा घात होतो.
शेतकरी तितुका एक एक!
01/11/2024
शेतकरी जर सक्षम झाला आणि आर्थिक संपन्न झाला तर *देवाघेवीच्या अटी* शेतकऱ्यांच्या हाती जातील. त्याची बार्गेनिंग पॉवर वाढेल. चांगला भाव मिळेपर्यंत तो शेतमाल विकणार नाही.
जर असे झाले तर शेतमाल स्वस्तात स्वस्त भावांने लुटणे शक्यच होणार नाही. *म्हणून शेतकऱ्याला कायमच "गरजू" ठेवणे आणि त्याला कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवणे* हेच सरकार नामक राज्यकर्त्यांचे अधिकृत धोरण असते.
शेतकरी तितुका एक एक!
03/11/2024
पक्ष, पक्ष नेते, उमेदवार राजकारण करिअर म्हणून करतात. मतदारांनी मतदान करिअर म्हणून करावे का?

#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी
शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफी का दिली जाते? #तुम्ही_शोधा_उत्तर_मी_झोपतो
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पुरोगामी महाराष्ट्रात
पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा आणखी किती राजकीय सत्यानाश व्हायला पाहिजे म्हणजे हे पुरोगामी सुधारतील?
#शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
गरिबी का आली ते तरी शोधून बघू
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
मोह मायेचा त्याग करण्याच्या
शेतकरी तितुका एक एक!
चुकीच्या पद्धतीने EVMचा बचाव
शेतकरी तितुका एक एक!
यंदा माथेरानला जायचं होतं.
शेतकरी तितुका एक एक!
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत
मसनात जा, ढोड्यात जा, चुलीत जा, भोकात जा हे ग्रामीण भागात सहज वापरले जाणारे ग्राम्य शब्द असले तरी फक्त गावंढळ लोकच वापरत असतात.
#शुभरात्री_लोक्सहो #नुसता_भुताचा_बाजार #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
पूर्वी अज्ञानी लोकांना भूत-प्रेत-पिशाच्च झपाटायचे; आता ज्ञानी-विज्ञानी लोकांना राजकिय पक्ष आणि नेते झपाटून टाकतात. दोन्ही स्थिती एकसमान. गुणात्मक फरक काही नाही.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
आज पाण्याच्या नळाच्या नळीतून पाण्याच्या धारेची धार न आल्याने आंघोळ धुवायची राहून गेलेली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
31 मे 2022
सनातनी व पुरोगामी यांच्या कट्टरपंथी अतिरेकापेक्षा मतदारांना मोदींचा मध्यममार्गी देशधर्म जास्त भावला, हे खरे आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
21/06/2025
विज्ञानवादी अभ्यास त्याचा, इतका विकसित झाला
पिकवतोय म्हणे टक्कलावर तो, हिरवा भाजीपाला
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
21/06/2025
HTBT तंत्रज्ञानाला विरोध करतात अन स्वतःला विज्ञानवादी समजतात.
#तुत्ते_तमिने_हलामी_थाले!
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
22/06/2024
फक्त एका बाजूची विनंती न ऐकता वटवृक्षाने नवऱ्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

#काय_म्हंता_लोक्सहो
शेतकरी तितुका एक एक!
22/06/2025
"नासुकली" या बोलीभाषेतील शब्दाला समर्पक व तितकाच स्पष्ट अर्थबोध देणारा प्रमाणभाषेतील पर्यायी शब्द सुचवा. #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
23/6/2022
शेतातील वीज कापायला काल पवार-ठाकरेंचे कर्मचारी यायचे. यानंतर कदाचित फडणवीस-शिंदेंचे कर्मचारी येतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता.
#वाजवा_टाळ्या_आणि_झोपा #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2023
केवळ शेतकरी विरोधी कायदेच नव्हे तर कायद्याचे जंगलच संपवणे आवश्यक आहे. म्हैस मनभर अन शिंगे टणभर.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2020
आमच्याकडे 'पाऊस' कधीच येत नाही, नेहमी 'पानी' येत असतो. आज पण बऱ्यापैकी 'पानी' आला.
तुमच्याकडे काय येतो? पाऊस की पानी? #गंगाधर_मुटे आर्वीकर #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 jun 2020
'भूक लागणे' हा रोग आहे आणि 'अन्न' हे त्यावरचे औषध आहे, जे आयुर्वेदिक आहे.
#RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2020
अलोपॅथी की आयुर्वेद श्रेष्ठ या वादात गुरफटण्यापेक्षा माणसं वाचवण्याला प्राथमिकता देण्याची माणुसकी माणसात का असू नये? #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2018
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
देरेनवेन्द्राचे सरकार म्हणजे "बंदीबाज" सरकार.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2018
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
आता इलॅस्टीकवरही बंदी आणा म्हणावं. रस्त्याने चालताना घसरलेले पॅन्ट सावरत शाळेत चाललेली लेकरं बघायची मला ओढ लागली आहे.
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
24 जून 2014
शेतीच्या दुर्दशेला पाऊस अजिबात जबाबदार नाही.
शेतीच्या दुर्दशेला पाऊस सोडून अन्य घटकच जबाबदार असताना
जो तो उठतो आणि पावसाला दुषणे द्यायला लागतो.
चोर सोडून संन्याशाला फ़ासी, म्हणतात ना, ते यालाच.
शेतीच्या दुर्दशेला जे घटक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची यांची औकात नाहीये कारण
पगारवाढ, बढती, करचोरी वा अन्यहितसंबंधावर गदा येण्याची भिती
तो बिचारा पाऊस ह्यांचे काहीच बिघडवू शकत नाही म्हणूनच चेकाळत असावेत हे.
"मोडक्या कूपावर लाथ द्यायची" सवयच अंगवळणी पडली ह्यांच्या.....!
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2023
शेतकरी संघटना ही एकमेव चळवळ आहे जी तर्कशुद्ध बावनकशी वैचारिक पायावर मार्गक्रमण करत आहे. यु. शरद जोशींनी मांडलेले शेतीचे अर्थशास्त्र व त्या अनुषंगाने अंगीकारावे लागणारे आंदोलनशास्त्र शास्त्रीय आणि तार्किक पातळीवर कोणालाही आजवर खोडून काढता आलेले नाही.
पण
बेरकी लोक नाव तर शरद जोशींचे घेतात पण यु . शरद जोशींचे तत्वज्ञान उलटे टांगणारे कार्य करत राहतात. मी त्यांचा निस्सीम अनुयायी आहे असाही आव आणत राहतात.
त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा घात होतो आणि आंदोलन चार पावले पुढे जाण्याऐवजी चार पावले मागे जाण्याची भीती उत्पन्न होते.
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते #आप्ल्याले_गधं_घोडं_सारखंच #शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2021
वडाचे झाड प्रचंड ऑक्सिजन देते हे त्या काळात सावित्रीला कळले होते... इतके तिचे विज्ञानावर प्रभुत्व असण्याची शक्यता आहे. तिला मेलेला नवरा जिवंत करण्याचे सायन्स त्या काळात अवगत असेल म्हणून तर तिने वडाच्या झाडाची निवड केली नसेल?
तसे असेल तर त्या काळातील विज्ञानाच्या तुलनेत आजचे विज्ञान फारच मागासलेले आणि चिल्लर स्वरूपाचे आहे असे म्हणावे लागेल.
=====
प्राणप्रिय व्यक्तीचा (नवरा सुद्धा त्यात आला) सात जन्म सहवास मिळावा ही उत्तुंग प्रेमभावना आहे आणि ती भावना प्रदर्शित करण्यासाठी वटपूजा हे माध्यम आहे.
एका सावित्रीबाईने स्त्रियांना शिक्षण दिले. त्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करण्याऐवजी चाणाक्ष महिलांनी चांगला, गलेलठ्ठ पगारवाला व देखणा नवरा मिळावा म्हणून केला. सावित्रीबाई फुलेंना उलटे टांगून वरून पुन्हा आम्ही पुरोगामी (अर्थात विज्ञानवादी सुद्धा) असल्याचा बडेजावही मिरवला.
एका जोतिबांच्या सावित्रीचा मदतीने शिक्षण घेऊन चांगला नवरा मिळवणे व दुसऱ्या सत्यवानाच्या सावित्रीच्या मदतीने तोच नवरा सात जन्म टिकावा म्हणून मग वटपूजा करणे...... हे चक्क मानसशास्त्रीय, गणितीय विज्ञान आहे.
ज्यांना यात अंधश्रद्धा दिसते ते अविज्ञानी बैताडबेलने असतात.
#गंगाधर_मुटे #तर्कशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
25 जून 2020
सृष्टी से पहले पृथ्वी नहीं थी, सूरज-चांद भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, तुम भी नही... केवल अकेला मै था! परेशान था!!
आता तुमच्या संगतीने दिवस मजेत जातो.
#शुभरात्री_लोक्सहो #गंगाधर_मुटे #RVKR
शेतकरी तितुका एक एक!
26 जून 2021
"तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी" उथळ विज्ञानवादी हे विधान विज्ञानात कसे बसवणार?
संवैधानिक मान्यता कशी देणार?
शेतकरी तितुका एक एक!
26 जून 2015
आम्ही शेतकरी झाडे लावतो आणि झाडे तोडतो सुद्धा!
कारण आम्ही कृतीशील कर्मयोगी आहोत. नुसते तोंडाने वाफ़ उडवणारे बोलघेवडे पर्यावरण वादी/प्रेमी/तज्ज्ञ नाहीत.
तोंडाची वाफ़ दवडल्याने कुठे निसर्गाच्या आगगाडीचे इंजिन चालत असते?
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2021
पुरोगामी इतके थयथयाट करत आहेत की जणू जोतिष्यशास्त्राला मान्यता दिली तर पुरोगाम्यांचे दुकानच बंद पडणार आहे!
#गंगाधर_मुटे
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2021
भंपकपणा, पाखंडीपणा व ढोंगीपणा... काही धार्मिक, निधार्मिक, साधूबुवा, महाराज, सनातनी, पुरोगामी, आस्तिक, नास्तिक यांच्यामध्येही असतो. सर्वात कहर म्हणजे स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे सर्वात भयंकर पाखंडी असतात. त्यांना कवडीचेही विज्ञानाचे ज्ञान नसते.
#गंगाधर_मुटे #अनुभवशास्त्र
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2018
युगात्मा शरद जोशींसारखे आम्ही मॅचविनर खेळाडू नाहीत, हे खरे आहे पण आपापल्या क्षमतेनुसार जमेल तितके रन काढून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे खेळाडू नक्कीच आहोत.
सर्व आजी-माजी-जुन्या-पुराण्यासहित नव्या दमाच्या होनहार खेळाडूंना विनंती आहे कि त्यांनी पॅव्हेलियन/ प्रेक्षकगॅलरीमधून मैदानात यावे. कर्णधार Anil Ghanwat यांचे नेतृत्वात मॅच जिंकू किंवा हरू पण संघर्ष तर नक्कीच करू, करत राहू.
कटिबद्ध खेळाडूंच्या समर्पित खेळातूनच ट्रॉफीवर हक्क नोंदवायचा मार्ग जाऊ शकतो.!!!
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~
: डिस्क्लेमर :
१) काही खेळाडूंना खेळाडू म्हणून खेळ दाखवण्यापेक्षा कर्णधार पदाची जन्मजात लालसा असते. त्या लालसेपोटी ते टीम मध्ये भांडणे लावून/फूट पाडून आपल्या समर्थकांचा गट करण्यात वस्ताद असतात. त्यांना मॅच जिंकण्यात वगैरे अजिबात रस नसतो. येनकेन प्रकारेन आपल्याला कर्णधार पद कसे मिळेल या अविचाराने पछाडलेले असल्याने ते सतत कर्णधाराविरुद्ध कारवाया करण्यात गुंतलेले असतात. अशांनी कृपया आमच्यात मिसळू नये.
मात्र ज्यांना धीर धरता येतो त्यांचे स्वागत असेल कारण आमच्या टीमचा कर्णधार दर दोन वर्षांनी बदलत असतो. कुणीही आपली कर्तबगारी सिद्ध केल्यास भविष्यात त्यांचे हाती कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची नैसर्गिक संधी असते. आम्ही दर दोन वर्षांनी सक्षम कर्णधाराच्या शोधात असल्याने कर्णधार पदायोग्य सक्षम खेळाडूचे अधीक पर्याय उपलब्ध झाल्यास आम्हाला त्याचा आनंदच वाटेल.
२) काही खेळाडू स्वतःला महान खेळाडू समजतात. प्रत्यक्षात ते खेळाडूच नसतात. त्यांना बॅट-बॉल हातात धरता येतच नाही पण साधे क्षेत्ररक्षण करण्याची देखील त्यांची कुवत नसते. मात्र त्यांची जीभ प्रचंड वेगवान गतीने चालत असल्याने ते अहोरात्र प्रशिक्षकाच्या भूमिकेत वावरत असतात. संपूर्ण टीमने त्याच्या इशाऱ्यानुरूप कार्य करावे, असा त्यांचा अट्टाहास असतो. कृपया त्यांनी लक्षात घ्यावे कि आमची कार्यकारिणीच आमची प्रशिक्षक असते. आमची टीम लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असल्याने काय निर्णय व्हायचे ते कार्यकारिणीत कधी एकमताने तर कधी बहुमताने होत असतात. ते सर्वांना बंधनकारक असतात. कार्यकारिणीत सर्वांना आपले विचार ठेवण्याची संधी असते. तिथे आपले विचार मांडून प्रत्येकजण संधीचा लाभ घेऊ शकतो.
~~~~~~~~~
ता. क : हे ललित लेखन असून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा या लेखनासोबत काहीही संबंध नाही. काही बाबी सुसंगत जाणवल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
27 जून 2017
सध्या शेतकरी आंदोलन फुल फॉर्मात आहे. पण खेळाडू दुर्दैवाने "चौफेर गोलंदाजी" करत आहेत. त्यामुळे सरकारी फलंदाजी नाबाद राहून कायमच खेळपट्टीवर पाय रोवून टिच्चून उभी आहे.
फलंदाजी चौफेर करायची असते. गोलंदाजी नेमकी विकेटच्या दिशेने करायची असते. खेळाडूंना हे मर्म जेव्हा कळेल तेव्हाच ही मॅच निर्णयाच्या व जिंकण्याच्या दिशेने जाईल, हे लक्षात घ्यायला हवे.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~
शेतकरी तितुका एक एक!
पाने