Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.

none




देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,.....

काव्यप्रकार: 
कविता

देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,
नसली पुरणपोळी तरी, चटणीभाकर खात जा .......

हातावर आणून देवा, पानावर खाण,
अस झाल देवा इथ, कष्टकर्याच जिण,
इचार येते मनात कसा, साजरा करू सण,
तरी देवा निवदाचा, भात तु खात जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

नाही यग्ययाग देवा, नाही देत कुणा दान रे ,
भिकही मागत नाही, मागत नाही वरदान रे,
नको खोटी शान देवा, नको नुसता मान रे,
फक्त लढण्यासाठी देवा, पाठीवर थाप तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा......

धनिकांच्या चढल्या इथे, मोठमोठ्या माड्या,
कष्टात मेल्या देवा, आमच्या किती पिढ्या,
गरीबांच्या देवा ओस पडल्या रे झोपड्या,
पण या झोपडीची देवा, आस तु करत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

हाती माळ घेवोनिया, जपत नाही नाम रे,
कष्ट करतो आम्ही इथे, गाळतो घाम रे,
त्या घामाचही आम्हा, मिळत नाही दाम रे,
पण पोटच्या भाकरीसाठी, काम तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

सांग कसा झाला देवा, माणुस माणसाचा वैरी,
माणसामाणसात कशी वाढत चालली दुरी,
अशा वेळी सांग देवा, कोण आम्हा तारी,
म्हणुन देवा जगाचा हा, भेद तु मिटवित जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

Share

प्रतिक्रिया