Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



डोळे आभाळाकडे

लेखनविभाग: 
पद्यकविता

डोळे लावूनी आभाळाकडे किती पाहू रे तूझी वाट
आतातरी ये अन वाहू दे माझ्या शेतात पाण्याचा पाट

आभाळी दिसेना एकही ढग शेताची बघ लागेल वाट
कसे कुणा सांगू भीतीने किती तट तट होतंय पोटात

घेतले व्याजी बी बियाणे पण कसा घालू पेरणीचा घाट
पाणी ना त्या विहिरीतही भेगाळली जमीन झाली ताठ

रूजणार कसे बियाणे पावसा का फिरवली अशी पाठ
तूच अमुचा अन्नदाता तुझ्याविना कशी लागेल ददात

मूल बाळं ती उपाशी गुरांचीही पोटाला लागली पाठ
सरकार दरबारी फिरलो पण ह्या नशिबाने केला घात

मृग नक्षत्र गेले कोरडे गेला कोरडा अवघा आषाढ मास
श्रावणात तर आशाच सोडली भादव्यात तर नकोच आस

शेतकरी राजाची नाही राहीली काहीच या देशात शान
उपाय ना अंमलबजावणी कसली, फुका घोषणांचा बाण

मातीतून रूजे ना एकही बियाणं कसे पूरवू देशाला अन्न,
ढेकळ झालेली सुकी जमीन पाहून माझं डोकं झालंय सुन्न

बैलपोळा कसला आता विसरावे लागले सगळेच सणवार
भुकेने कासावीस जीवांना पाहून जीव हा तुटतो वारंवार

देवास त्या विनवितो जाऊनी परत नको शेतकऱ्याचा जन्म
नको पाहणे ते दुःख कुटुंबाचे तीळ तीळ अन्नासाठी आजन्म

रूजले जरी धान्य, येतोस ऐन वेळी नसता काही आसभास
सोन्यामोत्याचीे कणसं मातीमोल धुळीस शेवटचीही आस 

कसे अवचित येऊनया तार तार करतोस माझी सगळी स्वप्न
कर्ज फेडण्या व्याकूळ मी, तू घेऊन जातोस तोंडातलही अन्न

बसलो आहे गुढग्यात खूपसून विचाराने भंगलेले सुन्नं डोकं
किती त्रास सहन करावा तुझ्याच आशेवर जगत होतं घरटं

आता एकच उपाय द्यावा हा जीव लावूनी गळ्याला मी फास
नाहीतर विष प्राशन करून संपवावा सगळ्याच जीवांचा त्रास

लाचार नको जगणे ते, हात पसरून थकलो आहे आता भारी
कर्जही माफ होईल थोडे, खाणारा एक जीव तरी होईल कमी

सोडून जातो पाठीमागे बायको मुले गुरं ढोर बिचारी बापुडी
दया दाखवून शासन देईल रक्कम मदत म्हणून तरी थोडी

© Kranti Patankar

Share

प्रतिक्रिया