नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
सांग थोडे पावसाला कोरडा मधुमास गेला
प्यायला पाणी मिळेना तोंडचाही घास गेला !
अंत:करणातून जेव्हा नष्ट झाली ओल सारी
पोत गेला या भुईचा रांगडा सहवास गेला !
पेटलेल्या कातळावर रौद्र जळते हे निखारे
भावभोळ्या जीवनाचा जाच ना वनवास गेला !
तापले आभाळ सारे करपली निष्पर्ण झाडे
मोसमाची आस गेली व्यर्थ हर अदमास गेला !
फोडलेले आर्त टाहो का तुला ऐकू न आले ?
तू दयाळू तू कृपाळू अढळ हा विश्वास गेला !
जिंकलेल्या वेदनांना जिंकण्याची जिद्द होती
याचसाठी प्राण त्याचा लावता गळफास गेला !
अंजली राणे वाडे .
वसई .
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर....
धन्यवाद सर....
अंजलीराणेवाडे
गजल
उत्कट अभिव्यक्ती
छान गजल!
हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
मन:पूर्वक आभार सर जी....
मन:पूर्वक आभार सर जी....
अंजलीराणेवाडे
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप