Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतकरी ( एक न सुटणारे गणित)

लेखनविभाग: 
पद्यकविता

शेतकरी ( एक न सुटणारे गणित)

शेती आमचे काम त्यावरच आमचे जीवन....
गाळावा लागतो घाम तरच मिळतो भात-वरण....

घेतो ग्राहक पिझ्झा २५० रुपयाला....
पण तो आमची भाजी मागतो १० ची ५ रुपयाला....

आम्ही गरीब शेतकरी व्यवसाय करतो प्रामाणिकपणे....
ग्राहक मात्र हॉटेलात चालू ठेवतो टीपदेणे....

शेती आमची अवलंबून असते या पावसावर....
कितीही प्रार्थना केली तरी पडत नाही तो वेळेवर....

सावकारचं वेगळेच लोढणे असते आमच्या गळ्याशी....
दगाबाजी झाली तर जमीन जाते त्याच्या घश्याशी....

संकटे आली तर चारही बाजुंनी एकाच वेळी येतात....
वाचवायला तेव्हा कोणीही नसतं सर्व पटकन दूर जातात....

नेहमीच सरकार सांगते आम्हाला मदत ते करणार....
त्यांची मदत मिळेपर्यंत आयुष्य आमचं इथेच संपणार....

जीवन शेतकऱ्यांचे नाही चालत कधीही सुरळीत....
कोणीही सोडवणार नाही असे आहे हे कठीण गणित....

© कॉपीराइट्स
कविता- लेखक: श्री. भूषण सहदेव तांबे
ई-मेल आयडी: bhushanstambe@yahoo.co.in

Share

प्रतिक्रिया