नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
खेळ खेळता आभाळाचा, रूप धरले मातीचे। सावळा गडी हरकुन गेला, नाव विसरले मातीचे।।०।।
सोन- सकाळी रात्र झाली नितळ जीवनाची। शेतकर्यांनो सावध व्हारे, वैभव ढळले मातीचे।।१।।
उंच भरारी घ्यावी आपण, कोणालाही वाटे।अंतर हे तर संपत नाही, नंतर कळले मातीचे।।२।।
ज्या लोकांनी गांव सोडले, त्या लोकांनी आता। शहरांमद्धे फ्लैट घेतले, प्रदर्शन भरले मातीचे।।३।।
नाव हे दुःखाचे कारण, नाव द्या पेटून।
नाव ठेवणार्यांनी तुमचे, कुरण चरले मातीचे।।४।।
भूक लागली असणार्यांनी, दळण दळले मातीचे। उप- वासी झाले जेव्हा, दुःख हरले
।।५।।
कवि/रचनाकार: डॉ रविपाल भारशंकर