नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
"शेतकरी तितुका एक एक" असे म्हणत असंघटीत शेतकरी समुदायाला एकत्र आणण्याची किमया साधणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि. ३०-०१-२०१५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदीरात संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, राज्याचे महसूल मंत्री मा.ना.एकनाथ खडसे व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
-----------------------
-----------------------