Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पाऊले चालली पंढरीची वाट

मी माझ्या मामासोबत (वय : नाबाद १०० ) पंढरपूर तिर्थयात्रा करून आलो. सोबत मावशी (वय : ८० ) होती.
त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत प्रवास अत्यंत काळजीपूर्वक करावा लागला.

दिनांक ५ जुलै ते ७ जुलै : वर्धा - यवतमाळ - पुसद - हिंगोली - औंढा - परभणी - परळी - अंबाजोगाई - लातूर - तुळजापूर - पंढरपूर - नगर - शिंगणापूर
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************
औंढा नागनाथ : ज्योर्तिलिंग

संत नामदेव औंढा नागनाथला आले असता त्यांना तेथे कीर्तन करू दिले नाही म्हणून त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरु केले.
मग नागनाथाने मंदीर फिरवून नामदेवाकडे तोंड केले. म्हणून या मंदीराचे तोड़ पश्चिमेस आहे. अशी वंदता आहे.

Pandharpur
********************************************************
ताज्या अन्नाशिवाय काहीही न गिळणाऱ्या घशाला आव्हान देत परळी बैजनाथाच्या पायरीवर बसून पहाटेची शिदोरी रात्री 11.30 वाजता खाण्याचा निर्णय घेतला.

Pandharpur
********************************************************
आदरातिथ्याबद्दल आभार Raj Pathan Sir __/!\__

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur
********************************************************

Pandharpur

********************************************************

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 29/01/2019 - 00:00. वाजता प्रकाशित केले.
    मामाश्रींचे वैकुंठगमन
     
    आमचे मामा गोविंदराव धरमुळ वय १०३ वर्षे ७ महिने त्यांचे आज दिनांक २८-०१-२०१९ रोजी कुठलाही आजार न होता विनाआजारानेच देहावसान झाले. वैशिष्टयपूर्ण बाब अशी कि परवाच्या दिवशी ते मला परवा पंढरपूरला जायचे आहे असे लोकांना सांगत सरपंचांना सांगून येतो असे म्हणत सरपंचाच्या घराकडे गेले होते. मी उद्या पंढरपूरला जाणार आहे असे काल ते लोकांना सांगत होते.
     
    आज सकाळपासून मी पंढरपूरला जाणार आहे असे सर्वांना सांगात होते. म्हातारपणामुळे आलेला स्मृतिभ्रम असे समजून सर्वांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
    आज ते गावाबाहेर नदीजवळ संडासला जाऊन आले. घरासमोरील मुख्य रस्त्यावर ते इकडे तिकडे सहज फिरले. म्हणजे आजच्या शेवटच्या दिवशीही ते विनाआधाराने एकटेच अर्धा ते १ कि.मी पायी फिरले. मागच्या महिन्यापर्यंत ते सहज ३-४ कि.मी. फिरत असायचे. एका वर्षाआधी म्हणजे वयाच्या १०२ व्या वर्षी ते एकटेच सेलूला ३ कि.मी. जाऊन परत यायचे.  
    आज ते १० वाजता जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि तो घास गिळण्याआधीच पंढरपूरला निघून गेलेत. तोंडातला घास तोंडातच राहिला.
     
    मामा गेले याचे दु;ख नाहीच, ते १०३ वर्षे जगले याचा आनंद आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली वाहण्याचेही कारण दिसत नाही कारण स्वआत्म्याला शांती मिळवण्यासाठी ते स्वतःच समर्थ आहे असे वाटते.
     
    मुख्य प्रश्न असा कि ते स्वतःची वेळ ठरवून आपल्यातून अगदी सहजपणे निघून गेलेत. युगात्मा शरद जोशी शेतकरी चळवळीतील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांगही १२ डिसेंबर या दिवशीच गेलेत. 
     
    या लोकांना हे कसे शक्य झाले असेल? हाच मुख्य प्रश्न ...!
    या प्रश्नाचे उत्तर आधुनिक विज्ञानाकडे नसेल तर ज्याला आपण प्रगत विज्ञान म्हणतो ते प्रगत विज्ञान नसून बाल्यावस्थेतील  प्रगतीशील विज्ञान आहे, असे म्हणावे लागेल.
     
    खोटी असतील, तर्कहीन असतील, निराधार असतील पण या प्रश्नांची उत्तरे अध्यात्माकडे आहे. जो पर्यंत विज्ञान अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे देण्याइतपत समर्थ होत नाही, तो पर्यंत आम जनतेवर विज्ञानाचा नव्हे तर अध्यात्माचाच प्रभाव आणि वर्चस्व राहणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
     
    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!