तु जान माणसा, सुजान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||धृ||
शेतक-याची बैलगाडी
लुळी- पांगळी झाली
वादळ वारा काळ पेटला
कोणी नाही वाली
अश्रृ ढाळतो शेतकरी, दया न माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||१||
खेळ मांडुनी क्लुप्त्यांचा
करणी केली मोठी
पांढरपेश्या कावळ्यांनी
धरणी केली खोटी
अन्यायाने घोट घेतला, छान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||२||
लय वज केली मातीची
छातीला लावुनं
आयुष्याची माती झाली
शेतीला वाहूनं
शेतक-यांची सुळावरती, माण माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||३||
शेतक-यांच्या कामक-यांच्या
घामाचे खाऊनं
मातीला ही विसरूण गेले
ए सी तं राहूणं
शेतक-यांचे नाही कुणाला, भान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||४||
भूमातेच्या पदरी केली
शेती लाजवंती
ओठ आपले हाय म्हणावे
आपल्याच दंती
शेतक-यांनी काय करावे, दान माणसा
फुलबागेचे कोणी केले, रान माणसा
||५||
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर
Thanking you
Thanks
Dr. Ravipal Bharshankar
वास्तववादी कवीता सुजान मानसा
वास्तववादी कवीता सुजान मानसा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
Thanking you
Thanks
Dr. Ravipal Bharshankar
सुरेख कविता
सुरेख कविता. पुढील लेखनास शुभेच्छा!
बहुधा तुम्ही वर्धा किंवा नागपूर संमेलनात सादर केली होती, असे आठवते.
सादरीकरण सुद्धा उत्तमच झाले होते.
शेतकरी तितुका एक एक!
अत्यंत आभारी आहे सर!
मी ही कविता वर्धेत सादर केलेली. आपल्या पहिल्या अ. भ. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात.
Dr. Ravipal Bharshankar
बळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
बळीराजा डॉट कॉमवर
उपस्थित पाहुणे
सदस्य प्रवेश
* आवागमन आणि सदस्य खाते सूचना
मोबाईल अॅप
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
Dr. Ravipal Bharshankar